‘वाडी-वस्ती’च्या वेशीवर...
दै. ‘प्रहार’मध्ये ‘वाडी-वस्ती’ कागदावर साकारताना, त्यानिमित्ताने आठवणी जागवताना आपला गाव, आपले शेत, आपली वस्ती, आपल्यावरील संस्कार या साऱ्यांतून आपले घडणे साकारावे, ही मूळ कल्पना होती. ‘वाडी-वस्ती’च्या निमित्ताने अत्रे यांनी दाखवलेली ‘पांढरी’ मुंबईसारख्या महानगरात आम्ही पाहत होतो. त्यामुळे ‘गाव-गाडा’च्या शताब्दी वर्षात हे पुस्तक यावे, याचे एक वेगळे समाधान आहे........